एरंडगाव ग्रामपंचायतीची जागा परत द्यावी

येवला- कर्मचारी वसाहत व कार्यालयासाठी एरंडगाव ग्रामपंचायतीने स्वत:च्या मालकीची जागा पालखेड पाटबंधारे विभागाला दिली आहे. मात्र सध्या त्या जागेचा कोणताही वापर होत नसल्याने सदर जागा ग्रामपंचायतीच्या ताब्यात द्यावी; अशी मागणी सरपंच विलास रंधे आणि ग्रामस्थांनी केली आहे.

1974 साली तत्कालीन सरपंच व सदस्यांनी पालखेड विभागाला स्व-मालकीची 61 गुंठे जागा दिली होती. 1980 पर्यंत या जागेवर पाटबंधारे विभागाने कर्मचारी वसाहतींसह कार्यालयाचे बांधकाम पूर्ण केले होते. त्या ठिकाणी अभियंता व इतर कर्मचारी 1996 पर्यंत वास्तव्यास होते. त्यानंतर मात्र तालुक्यात पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आणि कर्मचारी वसाहत सोडून जाऊ लागल्याने पुढे ती पूर्णपणे ओस पडली.

या जागेवर काटेरी व झुडूपांचे प्रमाण वाढले आहे. सध्या केवळ कार्यालयाचा वापर पालखेड विभागाकडून होत आहे. आसपासच्या इमारतींची पडझड झाल्याने ग्रामपंचायतीने 'पालखेड'ला दिलेली जागा परत देण्यात यावी अशी मागणी सरपंचांनी केली आहे.
 
थोडे नवीन जरा जुने